दृष्टिक्षेपात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईं होळकरांची माहिती

राजमाता अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी आणि पुण्यश्लोक स्त्री होत्या. त्यांचा जन्म इ.स. १७२५ मध्ये महाराष्ट्रातील चौंडी (जि. अहमदनगर) येथे झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे एक धार्मिक वृत्तीचे शेतकरी होते. बालपणापासूनच अहिल्याबाई यांच्यात नम्रता, सेवा, धार्मिकता आणि प्रजापालकतेची बीजे दिसून येत होती.

इंदौरचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी त्यांच्यातील गुण ओळखून त्यांचा विवाह आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी केला. मात्र काही वर्षांनी खंडेराव युद्धात धारातीर्थी पडले आणि पुढे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इ.स. १७६७ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे राज्यकारभार कुशल, न्यायनिष्ठ आणि प्रजाहितैषी होता. त्यांनी संपूर्ण भारतात धार्मिक व सामाजिक कार्ये केली. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले, तसेच गंगा घाट, मंदिरं, धर्मशाळा, विहिरी, तलाव यांचे निर्माण करून जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता केली. त्यांचे प्रशासन पारदर्शक, कडक पण न्यायप्रिय होते. अहिल्याबाई आपल्या पदावर असूनही सध्या वेशात राहून दररोज दरबारात हजेरी लावत असत.

त्यांचे संपूर्ण जीवन हे एक सेवाभाव, धर्मनिष्ठा, स्त्रीशक्ती आणि आदर्श नेतृत्व यांचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना “राजमाता” आणि “पुण्यश्लोक” ही बिरुदं प्राप्त झाली.

अहिल्याबाई होळकर यांचे जीवन हे केवळ इतिहासातील एक पान नाही, तर आजही अनेकांसाठी प्रेरणादायक आदर्श आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतातील अनेक शहरांमध्ये त्यांचे पुतळे उभारले गेले आहेत आणि शाळा, रस्ते, विमानतळ यांना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

“धर्म, न्याय आणि सेवा हेच त्यांच्या जीवनाचे सार होते.”

पदवीधर प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी – महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची माहिती…..

निबंध स्पर्धेची प्रस्तावना :
भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रशासनिक इतिहासात आपला अढळ ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्रिशतकीय जयंतीनिमित्त, त्यांच्या विचारांची उजळणी व्हावी, नव्या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी आणि त्यांच्या आदर्श नेतृत्वाचे चिंतन घडावे, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी – महाराष्ट्र राज्याच्या पदवीधर प्रकोष्ठाच्या वतीने एक राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेची उद्दिष्टे:

अहिल्याबाईंच्या कार्याचे अभ्यासपूर्ण आणि वैचारिक विश्लेषण करणे.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती आणि लेखनकौशल्य वाढवणे.

राजमातांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे.

स्पर्धेची प्रमुख वैशिष्ट्ये :

राज्यातील सर्व शाळा,विद्यालय आणि महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थ्यांना सहभागाची संधी

मराठी व इंग्रजी भाषांमध्ये लेखनाची मुभा

उत्कृष्ट निबंधांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारितोषिके

निवडक निबंधांचे प्रकाशन

नियम व अटी:

निबंध वयोगटानुसार दिलेल्या शब्दांमध्ये मर्यादित असावा

स्वतंत्र व मौलिक लेखन आवश्यक

दिलेल्या मुदतीपूर्वी निबंध सादर करणे अनिवार्य

स्पर्धकाचे नाव, महाविद्यालय, संपर्क यांचे संपूर्ण तपशील आवश्यक

ही निबंध स्पर्धा म्हणजे केवळ लेखनाची संधी नसून, पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जीवनमूल्यांचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करण्याचा एक सांस्कृतिक उपक्रम आहे. त्यांच्या त्रिशतकीय जयंतीनिमित्त हा एक वैचारिक अभिवादन समजून या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी – महाराष्ट्र राज्य, पदवीधर प्रकोष्ठ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नाव नोंदणीसाठी खालील फॉर्म भरणे आवश्यक आहे व

अधिक माहितीसाठी संपर्क

9821704350, 9082528568, 8082762162

पदवीधर प्रकोष्ठ


भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्ष्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली.